कुठचं काही जुळत नाही.
किती तरी दुर रहातो;
आठवण तुमची सतत येते.
धावत जाव तुमच्याकडे;
तर रस्ता फार दुरचा आहे.
या वेडया वाकडया विचारांना;
मनाची फक्त साथ आहे.
धावत जाते तुमच्याकडे;
त्याला वात्सल्याची आस आहे.
म्हणतात मुला व्यावसाय आहे;
शिक्षणाची काय गरज आहे.
मन मात्र खंबीर आहे;
शिक्षण हाच मार्ग आहे.
शिक्षणाची आस सुटत नाही;
पुस्तक हातून ठेवत नाही.
तुमचा विरह पटत नाही;
कुठचं काही जुळत नाही.
****** संभाजी कृष्णा
घाडी
****** वेताळ बांबर्डे
No comments:
Post a Comment