जिंकायचे नाही मला
तुला हरवून
जिंकायचे
नाही मला तुला हरवून,
स्पर्धा
नाही करायची मला, तूला नमवून.
नको
मला हे युद्ध, ज्यात तुझा पराजय होईल,
मला
फक्त लढायचय, ज्यात
तुझा विजय होईल.
तु
फक्त नम्र होऊन बघ, जय होईल तूझा.
नम्रतेत
शक्ती आहे, नम्रतेत
शांती आहे.
मने
जिंकून जग जिंकण्याची, नम्रतेत ताकद आहे.
विचार
कर निश्चय कर, मन तूझ मोकळ कर,
सोडून
दे द्वेष सारा, तू माझ्यावर विश्वास कर.
*** संभाजी कृष्णा घाडी
*** वेताळ बांबर्डे
No comments:
Post a Comment