नित्य सतावीन तुला
होतील यातना मला,
सोडूनी जाईन जेव्हा तुला.
कशी विसरशील मला,
स्वप्नी नित्य सतावीन तुला.
जरी सोडूनी गेलो तुज मी,
विसरू नाही शकत तुला मी.
कशी विसरशील सांग मला तू?
कशी टाकशील मनातून तू?
आठव तू ते क्षण दोघांचे,
जरी न पटले तुझे नी माझे.
किती भेटलो किती भांडलो,
तुझ्या वाचूनी नाही रमलो.
कसा विसरू सांग तुला मी?
मनातून तू कधी न गेली.
आठवणींची वादळ आली,
आसवांनी सृष्टी भिजली.
हृदय माझे तुजला दिधले,
चित्त माझे तुझं अर्पियले.
उरलो आहे आज भिकारी,
तुझ्या विना मी मृत प्रवासी.
तरी तुझी ही आज्ञा मानून,
आज तुला मी सोडून जाईन.
आठवणींच्या हिंदोळ्यावर,
नित्य तुला मी भेटत राहीन.
कवी: संभाजी कृष्णा घाडी
वेताळ बांबर्डे.
No comments:
Post a Comment